मुंबई दि.२७ सप्टेंबर
मंगळवारी मुंबईत मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर बैठक पार पडली. अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पिंपळगाव माळवी एमआयडीसी बाबत तसेच विविध ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत प्रश्न मांडले या बैठकीत सर्व बाबींवर सविस्तर चर्चा होऊन बैठकीत पिंपळगाव माळवी या गावातील एमआयडीसीचे आरक्षण उठवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर पोस्ट केले आहे.
त्याचबरोबर नवनागापूर गावातील एमआयडीसीच्या लगत असलेल्या जमिनीवर पेव्हिंग ब्लॉक सुशोभीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तसेच अंतर्गत रस्त्यांचे विकास धोरण देखील ठरविण्यात आले. यासोबतच भविष्यात अहमदनगर शहरात व जिल्ह्यात उद्योगाचे विविध मार्ग उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला.या बैठकीला एमआयडीसीचे सीईओ अनबलगन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, व सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.