मुंबई दि.१७ जुलै
शिवसेना नेते संजय राऊत बिनधास्तपणे विधाने करत असल्याने त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. भाजपापसून ते बंडखोर आमदारांपर्यंत सर्वच जण राऊतांच्या या बिनधास्त बोलण्यावर खट्टू आहेत. आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनीही राऊत यांना संयमाचा सल्ला दिला आहे. राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी केलं. दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भावना व्यक्त केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार असल्याचा दावाही सय्यद यांनी केला.
. दिपाली सय्यद यांच्या या दाव्या मुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राऊत यांनी थेट दिपाली सय्यद यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत नेत्या नाहीत आणि त्यांना प्रवक्त्या म्हणून बोलण्याचा अधिकार नाही असेही संजय राऊत यांनी सांगितल आहे.