मुंबई दि१ मे
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आज घाटकोपर येथील सोमय्या मैदानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत बोलताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला
कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने बिल्डर आणि बारमालकांचे कल्याण केल्याची टीका सुद्धा फडणवीस यांनी केली.
हनुमान चालीसा म्हटलं तर राजद्रोहाचा गुन्हा लावला. हनुमान चालीसा म्हटल्यावर राज्य उलथवण्याचं काम केलं. असं आरोपपत्रात म्हटलं. हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचे राज्य उलथवलं जाईल की रावणाचे ? एकदा सांगा तुम्ही रामाच्या बाजुने आहेत की रावणाच्या ? असा सवाल करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही फडणवीसांनी समाचार घेतला. मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी होतो, तुम्ही कुठे होता. हा देवेंद्र फडणवीस 17 दिवस सेंट्रल जेलमध्ये होता. बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसेनेचा नेता गेला नाही. बाबरी पाडली तेव्हा आरोप कुणावर झाले तर भाजपच्या नेत्यांवर असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.