Homeराजकारणअजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल या वक्तव्यावर खा. सुजय विखे यांची...

अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल या वक्तव्यावर खा. सुजय विखे यांची मिश्किल टिप्पणी सध्या दिवाळीच्या सुट्टीचा काळ असल्यामुळे लोक झोपा घेतात आणि स्वप्नही पाहतात त्यामुळे पुढील 30-40 वर्षात त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं- खा. विखे

advertisement

अहमदनगर दि.२७ ऑक्टोबर

आगामी विधानसभा निवडणुका महाविकासआघाडीमध्ये लढवण्यासाठी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आग्रही आहेत. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसही मुख्यमंत्रीपदासाठी आशावादी आहे. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

या वक्तव्य बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी मिश्किल टोला मारला आहे सध्या दिवाळी असून लोक विश्रांती घेतात आणि झोपा घेतात आणि काही लोकांची जास्त झोप झाल्यामुळे त्यांना स्वप्नही पडतात आणि हे स्वप्न निश्चित चाळीस वर्षानंतर पूर्ण ही होतील असा मिश्किल टोला सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्यावर लावला आहे. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री कोण होणार आणि पक्ष चालवणार कोण आणि पक्षाचे नेतृत्व कोण करणार करण भविष्यात भांडण होण्यापेक्षा हे आत्ताच जाहीर करावं त्यामुळे जनतेत भ्रम राहणार नाही.

तर माजी मंत्री युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मंत्रीपदाच्या कार्यकाळात सत्ता असताना अडीच वर्षात कधीही मुंबईच्या बाहेर पडले नाहीत. मात्र आता त्यांना मुंबईच्या बाहेर पडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचा वेळ भेटला आहे. जनता शहाणी असून त्यांना मतपेटीच्या आधारे मतदार योग्य ते उत्तर देतील असे सुजय विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत बोलताना सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular