मुंबई दि23 जून
2019 मध्ये राज्यातील सत्ता भाजपच्या हातातून गेल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या जिव्हाळी लागले होते. तर त्यावेळी सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह हात मिळवनी करत पहाटेचा शपथ विधी घडवून आणला होता. तर राज्याची सत्ता 72 तासांसाठी आपल्या हातात घेतली होती. मात्र विश्वास ठरावात ते सरकार जाणार यामुळे फडणवीस यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यावेळी अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटले होते. ज्यांना शोधण्यासह त्यांना परत महाविकास आघाडी सरकारमध्ये आणण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यांनीच त्यावेळी त्या आमदारांना विधानभवनात आणले होते.
दरम्यान या विषयाला आता तीन ते चार वर्षांचा कालावधी पार पडला असतानाच अशीच स्थिती बनली आहे. मात्र यावेळी सारथी बनलेले शिंदे आता आमदार घेऊन उडण छु झाले आहेत. ते मुंबई गोवाहटी व्हाया सुरत गेले आहेत. ज्यामुळे 2019 मध्ये शिंदे यांचे स्वागत करणारे शिवसैनिक आज 2022 मध्ये त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत आहे.