मुंबई दिनांक 10 जून
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले होते. त्यानुसार आता नगर विकास विभागाने १९” ड “वर्ग महानगरपालिकेला आदेश देऊन . प्रारुप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे आयुक्त, प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे जिल्हाधिका २ ३ ४ ५ प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देणे राज्य निवडण त्यांनी प्राधिकृ प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करणे आयुक्त, महा प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे जिल्हाधिका सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे जिल्हाधिका ६ ७ सुनावणीनंतर प्राप्त अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे राज्य निवडण त्यांनी प्राधिकृ अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे. असे आदेश देण्यात आले आहेत.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबलेल्या आहेत. 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा प्रशासकच हाकत आहेत.
ओबीसी आरक्षणासंदर्भात बांठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसींचे पूर्ण आरक्षण लागू असणार आहे. प्रभाग, गट आणि गणांची रचना झाल्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आता खर्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून, राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे.
महानगरपालिका
एकूण ड वर्ग महानगरपालिका : १९ (जालना व इचलकरंजी नवनिर्मित)
सध्या प्रशासक असलेल्या महानगरपालिका : 29