Homeशहरभोंग्याचा प्रश्न पुन्हा पेटणार..मस्जिदीवरील भोंगे तात्काळ काढुन टाकण्याच्या मागणी साठी.. सोमवार पासून...

भोंग्याचा प्रश्न पुन्हा पेटणार..मस्जिदीवरील भोंगे तात्काळ काढुन टाकण्याच्या मागणी साठी.. सोमवार पासून अमरण उपोषणास सुरुवात..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 14 जून

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र चालु असणारे अवैध गोवंशाचे कत्तलखाने तात्काळ बंद करून जमिनदोस्त करण्यात यावे, तसेच सर्व मस्जिदीवरील भोंगे तात्काळ काढुन टाकण्यात यावे या मागणी करिता आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साधु,महंत, हिंदु गोरक्षक व हिंदु सकल बांधव यांच्या सह मढी गाव चे सरपंच संजय मरकड यांनी सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरू करणारा असल्याची माहिती दिली आहे.

या बाबत माहिती अशी की संजय मरकड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यातील अवैध गोवंशाचे कत्तलखाने तात्काळ बंद करून जमिनदोस्त करण्यात यावे असे निवेदन दिले होते मात्र यावर आश्वासन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर 16 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरू करणारा असल्याची माहिती सरपंच संजय मरकड यांनी दिली आहे.

मस्जिदीवरील भोंग्यांची परवानगी घेतली जात नाही. भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजमुळे सर्व समाजातील धर्मातील लोकांना त्याचा त्रास होतो, विविध ठिकाणी, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, हॉस्पिटल जवळील ठिकाणी मोठ्या आवाजात दिवसातुन पाच वेळा नमाज पठण केले जात असल्यामुळे सर्वांवर त्याचा परिणाम होत असुन ते तात्काळ काढुन टाकण्यात यावे. तसेच महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असताना सुध्दा तसेच राज्य शासनाने नुकताच गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला असताना देखील वारंवार हिंदु समाजाच्या आराध्य दैवत असणा-या गोमातेची सर्रास पणे कत्तल जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैधपणे चालु असुन त्यांच्यावर कारवाही करून ती कायम स्वरुपी बंद करून जमिनदोस्त करण्यात यावी.
अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular