अहमदनगर दि१४ सप्टेंबर
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर, राहुरी या ठिकाणी धर्मांतर आणि लव जिहाद या प्रकारच्या घटना घडत असून श्रीरामपूर येथील एका आदिवासी मुलाने मुस्लिम तरुणीशी विवाह केल्याने त्याला मारून टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तर त्याआधी मुल्ला कटर या गुंडाने काही मुलींना कुंटनखान्यात विकल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सध्या महाराष्ट्रामध्ये या प्रकरणांमुळे चांगलाच गाजत आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यात येऊन या प्रकरणांबाबत आवाज उठवला होता.
महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतरण बंदी कायदा तात्काल लागू करावा या मागणीसाठी तसेच नगर जिल्ह्यात घडलेल्या लव्ह जिहाद घटनांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलंय
आज सायंकाळी अहमदनगर शहरात हिंदू जनजागृति समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात येणार असून आज (बुधवार)नगर शहरातील चौपटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोर हे आंदोलन सायंकाळी पाच वाजता होणार आहे.