अहिल्यानगर दिनांक 17 मे
ऑपरेशन सिंदूर या नावाने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करून नऊ तळ उध्वस्त केले.
भारतीय सैन्याचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे म्हणूनच अहिल्यानगरकरांच्या मनात असलेली देशाबद्दल व सैन्याबद्दल भावना आणखीन सुदृढ करण्यासाठी दिनांक 19 मे 2025 सायंकाळी 5 वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे
तिरंगा रॅलीचा मार्ग:- स्वातंत्रवीर सावरकर चौक, चितळे रोड, नेतासुभाष चौक, तेलीखुंट, इमारत कंपनी कापडबाजार येथे सांगता होणार आहे.
समस्त अहिल्या नगर वासियांना आवाहन करण्यात येते की त्यांनी रॅलीमध्ये सहभागी व्हावे, रॅलीच्या ठिकाणी तिरंगा झेंडा देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.