संभाजीनगर-दि१ मे
ज्या भाषेचा वापर तुम्ही करू शकता त्यापेक्षा तिखट भाषा माझ्याकडे आहे मात्र महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना मला हे करायचं नाहीये राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत मुस्लिम समाज कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही आता सरकार हे प्रकरण कसे हाताळता येईल हे पाहावे लागेल अस मत एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय.
हा हुकुमशाही वर नव्हे तर लोकशाही वर चालणारा देश आहे आज तरुणांसमोर बेरोजगातिची समस्या असताना तरुणांना चुकीची दिशा दाखवली जात आहे. भाजपचा सांगण्यावरून हे सर्व सुरू असून मनसे भाजपच्या इशाऱ्यावर वर चालत असल्याचा आरोप त्यांनी केलाय
समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय कोरीना काळात उपचारासाठी संघर्ष सुरू होता आता जातीपातीच्या कारणांवरून संघर्ष पेटवला जातोय. आता खिलजीचा विषय काढण्याची काय गरज होती चुकीच्या गोष्टींचा समर्थन करणार नाही न्यायालयाचा आदेश पाळावाच लागेल असं मतही त्यांनी भोंग्या च्या विषयावरून व्यक्त केले.