मुंबई दि.२९ जुलै–
यंदा उसाचा गाळप अधिक झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्यावर्षी सहकारी साखर कारखाने अधिक महिने चालवले आहेत. काही कारखाने तर एप्रिल महिन्यापर्यंत सुरु होते. सध्या अनेक राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदयाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या सह राज्यातील काही बड्या नेत्यांच्या कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
साखर आयुक्तांचा राज्यभरातील सात साखर कारखान्यांना दणका दिला असल्याची माहिती मिळाली आहे. 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.
साईकृपा साखर कारखान्या कडे आरआरसी रक्कम 2054.50 लाख रुपये थकीत असल्याची माहिती कळतेय.