मुंबई दि.१४ जुलै
महाराष्ट्र राज्यात सध्या शिवसेनेतून बंडखोरी गेलेले एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष असं सरकार असून या सरकारचा उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी 19 अथवा 20 जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळत असून भाजपकडून कमीत कमी मंत्र्याचा शपथविधी घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. भजवच्या चार ते पाच आमदार मंत्री पदाची शपथ घेतील या मध्ये चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. तर शिंदे गटा कडून चार जणांची नावे आघाडीवर आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो याकडे सर्वच राज्याचे लक्ष लागले असून मंत्रिमंडळात आता कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहे. एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोजच शिंदे गट आणि भाजप टीका करत असून काही खासदार शिंदे गटाकडे येण्याची शक्यता आहे . त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दर दिवसाला एक नवीन राजकीय गणित दिसून येत आहे. त्यामुळे आता या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.