मुंबई दि.१८ जून
राज्याची विधानपरिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल.’ तसेच, महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार असल्याचं,’ देखील अजिर यांनी म्हटलं आहे.
“चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. 11 पैकी 10 निवडून येणार आहे एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे 26 चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. “विधानपरिषद निवडणूक लागली आहे, 11 उमेदवार उभे आहेत. साधारण चार पक्षाचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभा केलेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी (NCP) शिवसेना (Shivsena) या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत.