Homeशहरराजकीय व्यक्ती आणि भाडेकरू यांना भुखंड कमी रक्कमेत मिळावा म्हणून सराफ व्यावसायिक...

राजकीय व्यक्ती आणि भाडेकरू यांना भुखंड कमी रक्कमेत मिळावा म्हणून सराफ व्यावसायिक मयूर कुलथे यांच्या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची सराफ सुवर्णकार संघटनेची मागणी

advertisement

अहमदनगर दि.२६ जुलै

अहमदनगर शहरातील नवीपेठ येथील आझाद चौक या ठिकणी असलेली पुरातन जीर्ण झालेली एक इमारत पडल्या नंतर आता या ठिकणी वाद होऊ लागले आहे.या इमारतीचे मालक मयुर दिलीप कुलथे हे असून त्या ठिकाणी इमारतीत असलेल्या काही दुकानदारांनी मयूर कुलथे यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला असून. मयूर कुलथे आणि त्यांच्या परिवाराची बदनामी होईल यासाठी खोट्या अफवा पसरल्या जात आहेत याबाबत सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन एक निवेदन देण्यात आले.

अहमदनगर शहरा मधील नवीपेठ परिसरातील आझाद चौक याठिकाणी मयूर कुलथे यांची मालकी हक्काची जागा होती ती अनेक वर्ष जुनी असल्यामुळे आणि ऊन पावसामुळे जीर्ण झाल्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक इमारत म्हणून घोषित केली होती दोन आठवड्या पूर्वी पावसामुळे ही इमारत जमीन दोस्त झाली.

या ठिकाणी असलेल्या मातीचे ढिगारे मयूर कुलथे यांनी मजुरांच्या साहाय्याने बाजूला करून त्या ठिकाणी पत्र्याचे कंपाउंड उभारले आहे.मात्र या परिसरातील काही राजकीय व्यक्ती या इमारतीमध्ये असलेल्या काही भाडेकरू मिळून मयूर कुलथे यांच्या विरोधात बदनामी करण्याचे षडयंत्र करत असून मयूर कुलथे यांच्या बाजूने न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार संपूर्ण जागेची मालकी ही मयूर कुलथे यांची असूनही काही लोक हेतू परस्पर बदनामी करून त्या ठिकाणी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असून भविष्यात या लोकांकडून खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने मयूर कुलथे यांच्या जागेत बळजबरी घुसणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी.अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटून सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular