Homeविशेषमिथुनने जाहीर केले हरवलेल्या भावाला सापडून देणाऱ्यास एकवीस हजारांचे बक्षीस

मिथुनने जाहीर केले हरवलेल्या भावाला सापडून देणाऱ्यास एकवीस हजारांचे बक्षीस

advertisement

अहमदनगर दि.९ ऑक्टोबर
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी जवळील घोटवी गावातील सरपंच असलेला अविनाश मिस्टर चव्हाण हा बेपत्ता असून त्याला शोधण्यासाठी त्याचे कुटुंबीय दोन महिन्यापासून प्रयत्न करत आहेत. अविनाश बेपत्ता झाल्याची तक्रार बेलवंडी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. तसेच अविनाश हा ज्या दिवशी बेपत्ता झाला त्याच दिवशी त्याची भाऊजई (चारुशीला रघुनाथ चव्हाण) ही सुद्धा बेपत्ता झालेली आहे. याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवून गेल्या दोन महिन्यांपासून अविनाश आणि चारुशीला यांचा शोध लागलेला नाही.

बेपत्ता झालेल्या अविनाश चा भाऊ मिथुन मिस्टर चव्हाण याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन बेपत्ता झालेल्या भावाला लवकरात लवकर सापडून द्यावे तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा त्यांनी आपल्या भावाला सापडून देण्यास मदत करत  नसल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आपला भाऊ नेमका सुखरूप आहे का  त्याचे  कोणी बरे वाईट केले याबाबत अद्याप काहीही माहिती मिळत नसल्याने सर्व कुटुंबीय चिंतेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पहा व्हिडीओ

तसेच अविनाश मिस्टर चव्हाण याला पकडून देणाऱ्यास 21 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा मिथुन मिस्टर चव्हाण यांनी केली आहे.अविनाश याचा पत्ता अथवा त्याला सापडून देणाऱ्यास हे बक्षीस पोलीस अधीक्षकांच्या हस्ते दिले जाईल असेही मिथुन चव्हाण यांनी सांगितले आहे.

अविनाश चव्हाण यांच्या बद्दल कोणाला काही ती माहिती मिळाल्यास ९९७००२२८२९ या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आव्हान मिथुन मिस्टर चव्हाण यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular