Home Uncategorized मनाची श्रीमंती असलेले आ. जगताप भविष्यकाळ आणखी गाजवतील ऍड. उज्वल निकम आ.संग्राम...

मनाची श्रीमंती असलेले आ. जगताप भविष्यकाळ आणखी गाजवतील ऍड. उज्वल निकम आ.संग्राम जगताप यांच्या कार्यावरील ‘विकासाचे संग्रामपर्व’ पुस्तकाचे शानदार कार्यक्रमात उदघाटन

अहमदनगर दि.१३ ,जून

पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते. आ. संग्राम जगताप यांच्याकडे अशी मनाची श्रीमंती आहे. ते स्वतःचा विचार न करता समाजातील दिनदुबळ्यांसाठी सतत कार्यरत असतात. त्यामुळे भविष्यकाळही ते निश्चितच गाजवतील. राजकारणात प्रत्येक टप्प्यावर यश मिळतेच असे नाही. काही वेळा एखाद्या प्रकरणात खोटे आरोपही केले जावू शकतात. अशावेळी डगमगता कामा नये. यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्य हे प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचे रणांगण आहे ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. मी चांगला आहे हा आत्मविश्वास झाला. पण मी एकटाच चांगला आहे हा अहंकार झाला. तो अहंकार आ. जगताप यांना कधी शिवू नये. आज मी त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, त्यामुळे व भविष्यातही माझी नजर तुमच्यावर राहणार आहे.

राजकारणात काम करताना आपल्याबरोबर कोण आहे व ते काय करतात याकडेही बारकाईने लक्ष दिले पाहिजे. शत्रूलाही अशी वागणूक द्यावी की तो सुध्दा तुमचे स्वप्नातही घेईल. कायद्यातील तरतुदींचा गैरवापर नगर जिल्ह्यात केला जातो याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणून कायदा वाईट नसतो तर तसा दुरुपयोग करणारे वाईट असतात. आज आपण आमदार आहात उद्या नामदारही होताल पण तुम्ही लोकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे, असे कौतुकोद्वार प्रसिध्द सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या विधानसभेतील कार्यकाळास ८.वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नगर शहरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या विकासाचे संग्रामपर्व या पुस्तकाचे प्रकाशन आ. जगताप यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सहकार सभागृहात झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. उज्वलनिकम बोलत होते.

कार्यक्रमास सिने अभिनेते मकरंद अनासपुरे,आ. अरूणकाका जगताप, माजी आ. दादाभाऊ कळमकर, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती
कुमारसिंह वाकळे, मनपातील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, अविनाश घुले, प्रमोद कांबळे, अंबादास
पंधाडे, प्रा. माणिक विधाते, प्रकाश धोत्रे, सी.ए. अशोक पितळे, चंद्रकांत गाडे, डॉ. देवदान कळकुंबे, हरजिसिंग
वधवा, मन्सूर शेख, सुहास मुळे, ऍड. शिवाजी कराळे, अॅड. सुभाष काकडे, डॉ. शशिकांत फाटके, डॉ. वंदना
फाटके, नगरसेविका शितल जगताप, सचिन गुजर, संभाजी पवार, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय सपकाळ, किशोर मरकड आदी उपस्थित होते.

मकरंद अनासपुरे म्हणाले की,माणसाची खरी कारकिर्द तीस चाळीस वर्षांची असते. त्यामध्ये आपण काय करतो, समाजासाठी काय करत हे महत्त्वाचे. लोकप्रतिनधी म्हणू आ. जगताप असेच समाजपयोगी का करीत आहेत. लोकांचे प्रेम मिळव आहेत. त्यांच्या दिसण्यात आ वागण्यातही देखणेपणा आहे. नगर स्मार्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित यशस्वी होईल. दोन वेळा महापौर दोन वेळा आमदार होणे ही साधी गोष्ट नाही. जनतेचे प्रेम असल्याशिवाय शक्य नसते. प्रतिकूल परिस्थित विरोध, टिका अशा सर्व गोष्टींवर मात करीत ते यशस्वी वाटचा करीत आहेत.

सत्काराला उत्तर देतान आ. संग्राम जगताप म्हणाले की नगर शहर हे वेगाने विस्तारत आहेत. गेल्या काही काळात होत असलेल्या विकासकामांतून नगरला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न आहे. खरे तर या पुस्तकाला विकासाचे संग्रामपर्व ऐवजी विकासाचे नगरपर्व असे नाव द्यायला हवे होते. कारण विकासकामे करताना नागरिकांची साथ महत्त्वाची असते. चाळीस वर्षांनंतर नगरसाठी नवीन पाणी योजना कार्यान्वित होत आहे. शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे, सुमारे चाळीस हजार पथदिवे बसविण्यात आले आहेत. करोना महामारीमुळे दोन वर्षे विकासकामांचा वेग कमी झाला, परंतु आता जोमाने विकासकामे सुरु आहेत. विकासकामांवर काही जण टिकाही करतात. आपले शहर म्हणून योगदान दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, विजयसिंह होलम, डॉ. देवदान कळकुंबे, प्रकाश धोत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत अमोल खोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार शशिकांत नजान यांनी मानले.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version