अहमदनगर दि.१० ऑगस्ट
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर 40 दिवसांनी का होईना झाला. या मंत्रिमंडळात भारतीय जनता पार्टी कडून शपथविधी प्रसंगी सर्वात प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शपथ ग्रहण केली. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचे भारतीय जनता पार्टी मधील स्थान एक नंबरला आल्याचं दिसून येते.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात काही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक असलेले धनंजय जाधव यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
तर शिवसेनेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर मागील विधानसभा निवडणुकी नंतर खा. सुजय विखे यांच्या बाबत आलेल्या काही बातम्यांचा उल्लेख करत रागाचे इमोजी टाकून निवडी बाबत नाराजी दर्शवली असल्याचे दिसून येत आहे. तर काही शिवसेनिकांनी उद्धव ठाकरे यांचे फोटो सोशल मीडियावर टाकून त्यांचा अभिनंदन केले. त्यामुळे शिवसेनेतही दोन प्रवाह दिसतात तर काँग्रेसचे नेत्याने विखे पाटलांचा निवडीबाबत पेढे वाटल्याने काहींच्या भुवया उंचावल्या आहेत.
तर या निवडीनंतर भाजपमध्ये शांतताच दिसून आली आहे.