Homeराजकारणविवाद नको आता बदल हवा.. प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याकरिता जनतेसोबत असेन; मी...

विवाद नको आता बदल हवा.. प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याकरिता जनतेसोबत असेन; मी जे काही बोलले तो प्रत्येक शब्द खरा करणार: सुमित वर्मा

advertisement

अहिल्यानगर दिनांक 10 जानेवारी

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारानिमित्त जनतेने अपार प्रेम दिले आहे मात्र हे प्रेम मताच्या रूपाने परावर्तित करून आपल्या भागातील विकास कामांसह सामाजिक काम करण्यासाठी एक वेळ संधी द्यावी असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुमित संतोष वर्मा यांनी प्रभाग क्रमांक 11 च्या मतदारांना केले आहे.

Oplus_0

प्रभाग क्रमांक 11 मधून ही लढाई बलाढ्य शक्तीविरुद्ध असतानाही मतदारांनी फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून आपल्याला पाठिंबा दिला आहे मात्र हा पाठिंबा मत रुपी उतरेल असा विश्वासही सुमित वर्मा यांनी व्यक्त करत नगर शहरात वाद-विवाद नको तर विकास व्हावा मी दिलेल्या प्रत्यक्ष शब्द आणि मी दिलेले प्रत्येक वचन निवडून आल्यानंतर नगरसेवक पदापर्यंत आणि नगरसेवक नसलो तरी कायमस्वरूपी पाळणारा व्यक्ती असल्याने आणि तरुणांना रोजगारासह बाजारपेठेतील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महानगरपालिकेत बाजारपेठेचा एक प्रतिनिधी पाठवावा असे आवाहनही सुमित संतोष वर्मा यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular