मुंबई, 19 जुलै :
आमदारांनी जेव्हा भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना उद्धव ठाकरे यांनी बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. सर्व खासदारांनी गेल्या महिन्यात 21 जूनला पक्षासोबत राहू, असं सांगितलं होतं. पण आम्ही त्यावेळी आमची भूमिका मांडली होती. आम्ही एनडीएच्या युतीतून निवडणूक लढवली आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचा त्रास होतोय, अशी भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडली होती. ठाकरेंनी आमची भूमिका मान्य केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर निश्चितच त्या निर्णयाचं मी स्वागत करेन, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत हे देखील होते”, असा मोठा खुलासा राहुल शेवाळे यांनी केला.
. उद्धव ठाकरे यांनादेखील भाजपसोबत युती हवी आहे. त्यांनी सर्व खासदारांना तसं सांगितल्याचा दावा शेवाळे यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी खूप प्रयत्न केल्याचं त्यांनी स्वत: खासदारांना सांगितलं होतं. पण भाजप पक्षश्रेष्ठी नाराज असल्याने युती होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी खासदारांना युतीसाठी प्रयत्न करण्याचा आदेश दिल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.