HomeUncategorizedशेतकऱ्याच्या बांधावरून.. शेतात चिखल ,हातात चप्पल परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीचे पाहणी करायला...

शेतकऱ्याच्या बांधावरून.. शेतात चिखल ,हातात चप्पल परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीचे पाहणी करायला आमदार लंके थेट शेतकऱ्याच्या बांधावर

advertisement

.पारनेर दि.२२ ऑक्टोबर

यावर्षी महाराष्ट्रभर पावसाने चांगलेच थैमान घातले आहे अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा परतीच्या पावसाने सध्या संपूर्ण नगर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ओढे, नाले नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसून येत असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांचे या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावुन घेतला आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सध्या सरसकट पंचनामे करून योग्य मोबदला द्यावा अशी अपेक्षा आहे दिवाळीत परतीच्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू होण्याची शक्यता आहे. जर सरकारने शेतकऱ्यांसाठी काही मदतीची घोषणा केली तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होऊ शकते. सध्या राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस सरकार असून विरोधात असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावं अशी मागणी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काही भागाला परतीच्या पावसाने चांगलेच झोपून काढले आहे. त्यामुळे शेतातील पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी या नुकसानीची पाहणी करण्याकरता थेट शेतकऱ्यांचे बांध गाठले असून त्या ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी आणि त्यांना धीर देण्यासाठी निलेश लंके हे चिखल तुडवत सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असल्यामुळे धड चालताही येत नाही मात्र शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून त्यांना धीर देण्यासाठी आमदार लंके यांनी थेट हातात चप्पल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या शेतकऱ्यांना धीर दिला आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांच्या पंचनामे करावे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी सरकारकडे केली आहे.

आमदार निलेश लंके हे आपल्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहेत. कोरोना संक्रमण काळात आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यासारख्या ग्रामीण भागात कोविड सेंटर उघडून त्या ठिकाणी हजारो रुग्णांना आधार दिला होता. विशेष म्हणजे कोरोना काळात घरातील व्यक्ती सुद्धा संक्रमण झालेल्या रुग्णाच्या जवळ जात नव्हती मात्र आमदार निलेश लंके हे २४ तास या कोविड सेंटर मध्ये वास्तव्यास असत आणि रुग्णांच्या बरोबर राहून त्यांना धीर देण्यासाज काम त्यांनी केलं होतं.त्याचप्रमाणे आता थेट चिखलातून शेतात जाऊन शेतकऱ्याला धीर देण्याचा काम आमदार निलेश लंके करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular