अहिल्यानगर दिनांक 12 जून
संतांची भूमी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख आहे त्याचप्रमाणे ऐतिहासिक अशा अनेक घडामोडी याच अहिल्यानगर जिल्ह्यात घडून गेलेले आहेत एका राजाने वसवलेलीस नगर म्हणून नगर शहराची ओळख आजही कायम आहे याच अशा ऐतिहासिक नगर शहराला विकासाकडे नेणारे नेतृत्व म्हणून आमदार संग्राम जगताप यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे.
ऐतिहासिक नगर शहर व परिसराचा गेल्या दहा वर्षात चेहरा मोहरा बदलत विकासाकडे नेणारे युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम अरुण काका जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नगर शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये घर करून बसलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे शहराचे लाडके नेतृत्व आमदार संग्राम जगताप लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे भैय्या म्हणून परिचित असलेले, विकासाचा ध्यास घेतलेले दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे संग्राम जगताप यांचे नाव घेता येईल.
१२ जून १९८५ मध्ये नगर शहरातील येथील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या संग्राम जगताप हे नगरसेवक महापौर ते आमदार पदापर्यंतचा राजकीय प्रवास आणि त्याचवेळी साधलेली विकासाची वेळ आजच्या तरुणपिढीसाठी निश्चित प्रेरणादायी आहे.
राजकीय प्रवासात 2009 ते 2011 पर्यंत ते पहिल्यांदा महापौर झाले होते तर 2014 ते 2015 पर्यंत दुसऱ्यांदा ते महापौर पदी विराजमान झाले होते.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून ती पहिल्यांदा निवडून आले असून आता त्यांची आमदारकीची तिसरी टर्म सुरू आहे.
विविध योजनेमधून अनेकांना लाभलाभाच्या योजना नगर शहरात घरा घरात पोहचवल्या.यावेळी अनेक योजना यशस्वी करत असताना गरीब आणि गरजू अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त आदी घटकांना विविध योजनेमधून लाभ मिळवून दिला. या कामामुळे आमदार संग्राम जगताप यांनी आपले स्थान घराघरांतील लोकांच्या मनात निर्माण केले.
रोज सकाळी आमदार संग्राम जगताप यांच्या ऑफिसवर नागरिक आपल्या अडीअडचणी घेऊन ऑफिसवर येत असतात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची अडचण काय आहे? हे समजून घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचा आमदार संग्राम जगताप यांचा स्वभाव सर्वसामान्य नागरिकांना मोहात पाडल्याशिवाय राहत नाही. भेटायला आलेल्या व्यक्तीला समाधानी भावनेनेच आमदार संग्राम जगताप परत पाठवतात, कधी कधी खूप गर्दी असली तर समोरच्या व्यक्तीशी बोलत असतानाच त्यांचे लक्ष दाराच्या बाहेर असलेल्या व्यक्तीवर असते.एखादी महिला भगिनी काम घेऊन आली तर प्राधान्याने तिची विचारपूस होते, तिचे प्रश्न सोडवले जातात.
मध्यंतरी महाराष्ट्र मध्ये झालेल्या राजकीय घडामोडी मध्ये आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देऊन त्यांच्या सोबत जाण्याचे ठरवले त्यामुळे विद्यमान सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करत आपल्या मतदारसंघात नेमके काय करावे लागेल यांचे ज्ञान अवगत केले. त्यामुळेच आपल्या पंचवार्षिक कालखंडात शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात जगताप यश आले. शहरात विविध उद्घाटने, भूमिपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची रेलचेल, असताना ‘त्या’ शेवटच्या व्यक्तीचे काम आमदार संग्राम जगताप यांच्या आठवणीत असते. स्वतः त्या व्यक्ती पर्यंत जाऊन त्याची विचारपूस करण्यास भैय्या कुठेही कमी पडत नाहीत.
२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी केलेली विकास कामे आणि जनतेच्या मनामध्ये मिळवलेली जागा यामुळे विजयाची हॅट्रिक साधली.आणि तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ आणि नगरकरांचा विश्वास यावर चाळीस हजार पेक्षा जास्त मतांनी त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली.
नगर शहराची ओळख अनेक वर्ष एक खेडं आणि खड्ड्यांचे शहर म्हणून होती. मात्र आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून सिमेंटच्या रस्त्याचे जाळे विणले, अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध केली. भैय्या नव उद्योजकांच्या शुभारंभाला जातात आवर्जून युवकांना जवळ बोलावून कोणत्या क्षेत्रात करिअर करणार असा सवाल करतात. व त्यांना मार्गदर्शनही करीत असतात. असे नगर शहराचे लोकप्रतिनिधी आमदार संग्राम जगताप एक मुलखावेगळं अजब गजब रसायन आहे. लहानांपासून थोरांपर्यंत चाहता वर्ग वाढवत आहेत. अशा दिलखुलास व्यक्तिमत्त्वास उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा!