अहमदनगर दि. १६ मे
अहमदनगर शहरात वाहन बेशिस्त चालवणे किंवा लावणे या साठी नागरकरांची स्पर्धा लागली आहे का काय असच काही ठिकाणच्या परिस्थिती वरून दिसून येत आहे.शहरात प्रोफेसर कॉलनी चौकात रात्री च्या वेळेस मोठी चौपाटी खाण्याच्या गाडया लागलेल्या असतात मात्र या ठिकाणी आलेल्या ग्राहकांची जणू स्पर्धा लागल्या सारखी दिसून येत थेट रोडवर दुचाकी चारचाकी गाड्या लावल्या जातात या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना या परिसरातील स्थानिक नागरिकांचे काही घेणं देणं नाही अशा अविर्भावात ग्राहक गाड्या रस्त्यात लावून रस्ता जाम करून टाकतात.
त्या मुळे स्थानिक नागरिक किंवा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे वाद होतात कधी ही गोष्ट हाणामारी वर जाते तर याठिकाणी रोड रोमिओ गाड्या भर रस्त्यात जाऊन टवाळखोरी करत बसतात कधी कधी रस्त्यावर वाढदिवस साजरे केले जातात असे प्रकार घडत आहेत तर याच प्रकारे शहरातील अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंग करून काही नगरकर आम्ही बेशिस्त आहोतच हे दाखवून देत असतात रात्री लागणाऱ्या चौपटी आणि त्या ठिकाणी होणारी बेशिस्तपणाने लावल्या जाणाऱ्या गाड्या मोठं डोके दुखी होत असून या बेशिस्तीमुळे एखादा अपघात किंवा मोठी घटना घडू शकते त्या साठी शहर वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे