अहमदनगर दि.३० ऑक्टोबर –
सन – उत्सवातून आपल्या संस्कृती परंपरेचे जतन केले जाते. दिवाळी पाडवा या सणाला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. युवा पिढीला आपल्या महान संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी आपले सण मोठ्या उत्साहात साजरे केले पाहिजे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी गेली तीस वर्षापासून जिल्हाभरातील नागरिकांना आमंत्रित करून मोठ्या उत्साहात स्नेहमेळावाचे आयोजन केले जाते या माध्यमातून एकमेकांमधील आपुलकीचे नाते जोडले जाते असे प्रतिपादन मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्यातील बुऱ्हानगर येथे मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले परिवाराच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून दिवाळी पाडव्यानिमित्त स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या मेळाव्याला जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खा. सुजय विखेपाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आ.अरुणकाका जगताप, आ.संग्राम जगताप, मा.आ.भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप, विवेक कोल्हे, अनुराधा नागवडे, अण्णासाहेब मस्के, चंद्रशेखर घुले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, विजय गडाख, सिताराम गायकर, ह.भ.प जंगले महाराज शास्त्री, उपमहापौर गणेश भोसले, किशोर डागवले, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, मा. महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे, दिलीप लांडे, दादाभाऊ चितळकर, शहाजीराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, राजेंद्र चोपडा, डॉ.सतीश सोनवणे, राजेंद्र बोथरा, विश्वनाथ कोरडे, सुनील साळवे, आनंदराव मुनोत, अनिल पोखरणा, हाजी नजीर शेख, करीम हुंडेकरी, सचिन जगताप, नगरसेवक रामदास आंधळे, मनीष साठे, चंद्रकांत गाडे,सुरेंद्र गांधी, अरुण होळकर, संभाजी दहातोंडे, सुभाष पाटील,प्रा. माणिकराव विधाते, न्यानेश्वर रासकर, अशोक पितळे, बाळू शेठ धाडीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपाचे नेते अक्षय कर्डिले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.