मुंबई दि.११ मे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आले असून या पत्रात जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगिततर आहे.
याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. या आलेल्या धमकी पत्रांमध्ये उर्दू शब्दांचा वापर केल्याचं त्यांनी सांगितय भोंग्या बाबत सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या दिल्या जात आहे असा आरोपही नांदगावकर यांनी केला आहे.अजान आणि भोंगे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी ये खटाटोप चालू असून राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल असाही नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
या पत्राबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत दखल घ्यावी असंही नांदगावकर यांनी सांगितलंय