मुंबई दि.२ जुलै
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचं राजकीय नाट्य सुरु होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर या सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला मात्र त्यावेळी त्यांना पाठिंबा देणारे सर्व आमदार अद्याप देखील गोव्यात आहे. पण हे सर्व आमदार आज मुंबईत परतणार आहेत. मुंबईत नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व आमदार आज मुंबईत परतणार असल्याचे स्पष्ट केले.
हे आमदार गोव्यातून मुंबईकडे यायला निघाले आहेत तर काही आमदार हे स्पेशल विमानाने गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळ वाटपासाठी चर्चा होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिले आहे