Homeविशेषसाने गुरुजी स्मारकाचे पंढपुरात होणार लोकार्पण तनपुरे बाबा पायी चारोधाम पदयात्रा...

साने गुरुजी स्मारकाचे पंढपुरात होणार लोकार्पण तनपुरे बाबा पायी चारोधाम पदयात्रा व अन्नदान सेवा कार्याचाही अमृतमहोत्सव

advertisement

अहमदनगर दि.४ नोव्हेंबर :
पंढरपुरातील विठ्ठल मंदिर दलितांना खुले व्हावे यासाठी स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांनी केलेल्या उपोषणाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त समतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पंढपुरात तनपुरे बाबा मठात साने गुरुजींचे स्मारक साकारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण ८ नोव्हेंबरला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्टचे अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तनपुरे, पद्मश्री पोपटराव पवार व साने गुरुजी स्मारक समितीचे अध्यक्ष राजा अवसक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.


राष्ट्रसंत तनपुरे महाराज यांच्या ३७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम होत आहे. वारकरी संप्रदायाने समतेचे तत्व सांगितले. परंतु पंढपुरात १९४७ सालापर्यंत दलितांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. विठ्ठल मंदिराचे दरवाजे दलितांना खुले व्हावे यासाठी १ ते १० मे १९४७ असे दहा दिवस साने गुरुजींनी पंढपुरात उपोषण केले. या उपोषणासाठी त्यावेळी त्यांना जागा मिळत नव्हती. मूळ अहमदनगर जिल्ह्यातील दगडवाडीचे असणारे राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे यांनी पंढरपुरातील आपल्या मठात ती जागा दिली. त्यांनी या समतेच्या लढ्याला साथ दिली. या घटनेचेही हे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. मात्र आजवर साने गुरुजींचे पंढपुरात काहीही स्मारक नाही. या समतेच्या लढ्याचे स्मरण म्हणून राष्ट्र सेवा दल व साने गुरुजी प्रेमींनी साने गुरुजी स्मारक समिती निर्माण करुन पंढपुरात साने गुरुजींचे स्मारक साकारले आहे. या स्मारकासाठीही तनपुरे महाराज मठानेच जागा उपलब्ध करुन दिली आहे.

राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे यांनी सामान्य वारकऱ्याला भारत भ्रमण करुन वेगवेगळे प्रांत समजावून घेता यावेत यासाठी चारोधाम पदयात्रा सुरु केली होती. तो एकप्रकारे ‘भारत जोडो’चा कार्यक्रम होता. त्यांनी काशी, केदारनाभ, बद्रीनाथ आदी तिर्थस्थळांना जाण्यासाठी सुरु केलेल्या पदयात्राही ऐतिहासिक आहेत. त्या पदयात्रांचेही हे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. तसेच तनपुरे बाबांनी गाडगेबाबांच्या प्रेरणेतून पंढपुरात अन्नदान सुरु केले. त्याही परंपरेला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्याचेही हे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. या सर्व घटनांच्या निमित्ताने पंढपुरात ७ व ८ नोव्हेंबर रोजी हा समारंभ होत आहे. यात ७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून वारकरी दिंड्या व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते पंढपुरात येणार असून त्यादिवशी प्रार्थना दर्शन सोहळा होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शरद पवार यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार बबन शिंदे राहणार आहेत, अशी माहिती बद्रीनाथ तनपुरे यांनी दिली. पत्रकार परिषदेला डी.एम. कांबळे, साईराम बनकर, रामकृष्ण कर्डिले, राजेंद्र पाचे, बाळासाहेब कोलते, बाजीराव खुळे आदी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular