HomeUncategorizedसंगमनेर मध्ये अवैध गोमांस कत्तलखाने सुरूच खेड आणि औरंगाबाद पोलिसांनी पकडले संगमनेर...

संगमनेर मध्ये अवैध गोमांस कत्तलखाने सुरूच खेड आणि औरंगाबाद पोलिसांनी पकडले संगमनेर वरून आलेले गोमांस तर आगामी निवडणूका निःपक्ष व निर्भय वातावरणात पार पाडायच्या असल्यास संगमनेरच्या पोलीस निरीक्षकांची बदली करा सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांची मागणी

advertisement

संगमनेर दि. १५ मे
संगमनेर मध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करून अवैद्य वंशीय कत्तलखाने उघडून टाकले होते मात्र हे कत्तलखाने पुन्हा एकदा चोरीछुपे सुरू असल्याचे उघड झाला असून संगमनेर वरून राजगुरू नगर कडे जाणाऱ्या एका टेम्पो वर खेड पोलिसांनी कारवाई करून गोमांस जप्त केले तर दुसरी कारवाई औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे करण्यात आली असून दोन्ही ताराबाई मध्ये सुमारे 13 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे यावरून संगमनेर मध्ये कत्तलखाने सुरू असल्याचं सिद्ध होत आहे.

तर दुसरीकडे संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची बदली करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निःपक्ष व निर्भय वातावरणात पार पाडायच्या असल्यास त्यांची बदली करा अशी मागणी त्यांनी केलीय.

सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ मी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मुकुंद देशमुख यांचे संगमनेर मधील बड्या राजकीय प्रस्था बरोबर नातेसंबंध असून त्यांनी पदभार घेतल्यापासून राजकीय पक्षाच्या त्या नातेवाईकांना पूरक अशी भूमिका घेतल्याचं आरोप खताळ यांनी केलाय.

काही महिन्या पूर्वी संगमनेर आणि अकोले या पोलिस ठाण्याच्या पोलिसांवर लाचखोरीचे कारवाई झाली होती त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने संगमनेर चे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि अकोले चे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची नियंत्रण कक्षात बंदी करण्यात आली होती. आता काय दिवसानंतर पुन्हा पोलीस निरीक्षक देशमुख यांना संगमनेर पोलीस ठाण्यात पुन्हा रुजू करण्यात आले होते तर अभय परमार यांना नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले होते त्यामुळे राजकीय वरदहस्त वापरून त्यांनी ही बदली केल्याचा ही अमोल खताळ यांनी आरोप केला आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे यापूर्वी २७ ऑक्टोबर, २०२१ आणि २३ फेब्रुवारी, २०२२ ला पुरावे व छायाचित्रांसह तक्रार दाखल केली आहे, तर आता १० मे, २०२२ रोजी त्यांनी पुन्हा एकदा स्मरणपत्राद्वारे आयोगाला आपल्या तक्रारीची दखल घेण्याची विनंती केली असून त्यावर ठराविक कालावधीत कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी या तक्रारीच्या माध्यमातून दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular