दिल्ली दि.१० जुलै
खासदार राहुल शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, असे पत्र काढले त्या नंतर आता दिल्ली येथे झालेल्या 16 खासदारांच्या बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करून भाजप बरोबरचे जुन्या संबंधना पुन्हा नव्याने जुळवून घेण्यात यावे असा सूर सर्व खासदारांनी लावला आहे.
एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे राष्ट्रवादी व काँग्रेससंदर्भात जो विचार आहे, तोच विचार यावेळी खासदारांनीही बोलून दाखवला. गेल्या अडीच वर्षांत खूप काही सहन करावे लागले, असेही स्पष्टपणे सांगितले गेले. आपल्या भावना कळल्या पण आता आपण फार पुढे गेलो आहोत, भाजपने मातोश्रीबद्दलही वाईट प्रचार केला, त्याचे काय असा थेट सवालच ठाकरेंनी केल्यानंतर; ही सुरुवात ‘सामना’मधून मोदींवरील टीकेपासूनच सुरू झाल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. बंडाळी नाट्याप्रसंगीही सामोपचाराची परिस्थिती असताना संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत होते, त्यामुळे सारा खेळ फिसकटला. त्यामुळेच संजय राऊत यांना आवरायला हवे, अशी आग्रही मागणीही या खासदारांनी केली.
बंड केलेल्या आमदारांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता मात्र संजय राऊत यांनी वेळोवेळी खंडोबा आमदारांनी विरुद्ध केलेल्या चुकीच्या शब्दप्रयोगांमुळे हे आमदार दूर होत गेले आहेत त्यामुळे आता शिवसेना पक्षाची पडझड थांबवायची असेल तर संजय राऊत यांना वेळीच आवरायला हवे अन्यथा यापुढेही पडझड अशीच सुरू राहील अशी भीती या 16 खासदारांनी व्यक्त केली आहे.