अहमदनगर ३० मे
शिवसेनेकडून दुसऱ्या टप्प्यातील शिवसंपर्क अभियानास सुरूवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये शिवसेना नेते खा. गजानन किर्तीकर नगर जिल्हा दौऱ्यावर होते मात्र जावळी शिव संपर्क अभियान याबरोबरच शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी अनेक दिवसांची मनातील खदखद बोलून दाखवली प्रत्येक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर तक्रार केली संपर्क मंत्र्यांपासून स्थानिक आमदार पर्यंत सर्वांनी तक्रारीचा पाढा वाचला.
नगरमध्ये झालेल्या शहर शिवसेनेच्या बैठकीत काही जणांनी तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांना बदला, अशी थेट मागणी यावेळी करण्यात आल्याचे समजते. कोरगांवकर यांच्याकडून राष्ट्रवादी पूरक भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करण्यात या बैठकीत करण्यात आला.सत्तेचा काहीच फायदा मिळत नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. शहर शिवसेनेत गट तट असून ते संपले पाहिजेत. संपर्कप्रमुख कोरगांवकर हे शिवसैनिकांना कमी वेळ देत असून राष्ट्रवादीशी जास्त सलगी करून आहेत. त्यामुळे त्यांना बदलून अन्य दुसऱ्या नेत्यांना नगरचे संपर्कप्रमुख करण्यात यावे, अशी मागणी किर्तीकर यांच्याकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तर दुसरीकडे कर्जत येथे गेल्या नंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला आहे. शिवसेना पदाधिकार्यांनी ज्या तक्रारी केल्यात, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशारा गजानन कीर्तिकर यांनी दिला आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांच्या इशाऱ्याला रोहित पवार नेमकं काय उत्तर देतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.हा सर्व प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कुरबुरी नेहमीच सुरु असते. या कुरबुरी चित्र नेहमी समोर येत असतं. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातले नेते आपल्याच मित्रपक्षांवर टीका करताना आपण नेहमीच बघतो. अशातच शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे कारणही तसेच असून आणि ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच विकासामध्ये वाटा देण्यात दुजाभाव करत असल्याच्या तक्रारी या शिव संपर्क अभियानादरम्यान सर्वांनी समोर आणल्या आहेत त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.