मुंबई दि.१७ जून
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. निकालामध्ये बारावीनंतर कोकण विभागाने बाजी मारली असून दहावीतही नाशिक विभागाने मार खाल्ला आहे. नाशिक विभाग ९५.९० टक्क्यांसह राज्यात तळाशी आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.९६ टक्के तर मुलांचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
पुणे: 96.96%
नागपूर: 97%
औरंगाबाद: 96.33%
मुंबई: 96.94%
कोल्हापूर: 98.50%
अमरावती: 96.81 %
नाशिक: 95.90%
लातूर: 97.27%
कोकण: 99.27%
दहावीच्या परीक्षेला १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. आज दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.