मुंबई दि.५ ऑगस्ट:
राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केला होता.
25 जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगान ही मोठी घोषणा केली. झेडपी सदस्य संख्येच्या बदलाच्या निर्णयामुळे निवडणूक स्थगित झालेली आहे. सदस्य संख्येच्या अंमलबजावणीसाठी वेळ लागणार असल्याने हे स्थिती देण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने परित्रक जाहीर करत निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याची घोषणा केली आहे.