पुणे दि.१२ मे
संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली असून सध्या तरी आपण कोणत्याही पक्षात न जाता येणारी राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असून सर्व राजकीय पक्षांकडे जाऊन मला पाठिंबा द्यावा असं आवाहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच पुढील भवितव्यासाठी स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असून यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्र दौरा मोरे नागरिकांची कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून पुढील काळात स्वराज्य संघटना राजकीय पक्ष करण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितला आहे.
आतापर्यंत स्वराज्य संघटने बाबत कोणताही झेंडा अथवा चिन्ह ठरवले नसून लोकांमध्ये जाऊन याबाबत मत घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र हृदयात असलेले केशरी रंग कोणीही काढू शकत नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.