अहमदनगर दि.२९ जुलै :
पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असून, या वर्षातील प्रत्येक क्षण नवीन पिढीसाठी काही तरी करण्याची प्रेरणा देणारा असल्याने, १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा कार्यक्रमाचे सर्वांनी यशस्वी आयोजन करता यावे यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या उपक्रमाच्या धर्तीवर आपल्या अहमदनगर महानगरपालिके मार्फत अहमदनगर शहरात देखील 75 हजार घरावर तिरंगा झेंडा फडकविण्याचे उद्देश ठेवण्यात यावा.
हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचिण्यासाठी विविध चौकामध्ये तथा कॉलन्यामध्ये, गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेत या कार्यक्रमाची जनजागृती होईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात यावी. तसेच या कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता संपूर्ण शहरात व उपनगरात लाऊड स्पिकर असलेली रिक्षा लावून देखील जनजागृती करावी. तसेच मनपाच्या सर्व नगरसेवकांबरोबर आपण बैठक घेवून या उपक्रमाची माहिती देवून नगरसेवकांच्या प्रभागामधील नागरिकांसाठी योग्य ते मार्गदर्शन करून या अभियानात सहभागी होण्याकरिता आवाहन करावे. तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिने प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या कर्मचा-यां मार्फत झेंडा विक्री केंद्र उभारावे हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करावा अशी मागणी महानगरपालिकेचे माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे .