Homeशहरमुख्य बाजारपेठेतील हातगाडीवाले पथारीवाले यांचे अतिक्रमण जो पर्यंत निघत नाही तो...

मुख्य बाजारपेठेतील हातगाडीवाले पथारीवाले यांचे अतिक्रमण जो पर्यंत निघत नाही तो पर्यंत अहमदनगर व्यापारी महासंघ शांत बसणार नाही मतभेद आहेत जातीभेद नाही – व्यापारी महासंघाचा खुलासा

advertisement

अहमदनगर दि.८ ऑगस्ट

अहमदनगर शाहरतील कापड बाजार येथील हातगाडी वाले व पथारीवाले यांच्या विरुद्ध व्यापारी असा संघर्ष चांगलाच रंगला होता मात्र कालांतराने दोन्ही बाजूनी शांतता झाली असे वाटत असतानाच हा संघर्ष संपलेला नाही असे व्यापारी महासंघाने काढलेल्या एका पत्रकावरून दिसून येतंय.

अहमदनगर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष ईश्वर बोरा, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष रवी किथानी, महावीर कांकरिया, एम जी रोड व्यापारी असोसिएशन चे संचालक प्रतीक बोगवत यांच्या वतीने एक पत्रक काढण्यात आले असून या पत्रकात असा खुलासा करण्यात आला आहे की रविवारी मोहरम निमित्त हाॅकर्स संघटने कडून कापड बाजार येथे शरबत वाटप चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. हाॅकर्स संघटने ने संघटने मार्फत अहमदनगर व्यापारी महासंघ व कापड बाजारतील व्यापाऱ्यांना विनंती केली की आपल्यात मत भेद आहेत, जाती भेद अगर मन भेद नाही, तरी आपण सर्वांनी शरबत वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थितीत राहून सर्व मुस्लिम बांधवांना मोहरम निमित्त शुभेछा द्याव्यात. हा विचार व्यापारी महासंघ, एम जी रोड व्यापारी असोिएशन व उपस्थित व्यापाऱ्यांना सुद्धा मान्य होता व आहे तसेच आमच्यात जातीय सलोखा रहावा या उद्दिष्टाने आम्ही सदर ठिकाणी गेलो.

परंतु काही राजकीय लोकांनी सदर प्रसंगाचा विपर्यास करत सदर प्रसंगाचा मागील काळात अतिक्रमणविरोधी आंदोलनाशी जोडून, आंदोलन संपला असे प्रसिध्दी माध्यमातून जाहीर केला. तरी अहमदनगर व्यापारी महासंघ व व्यापारी द्वारे सदर खुलासा देत जाहीर करण्यात येते की अहमदनगर व्यापारी महासंघ व हातगाडी धारक व पथारीवाले यांच्यात कोणताही धार्मिक वाद नसून शहराच्या सार्वजनिक विकासाच्या दृष्टीने व व्यापाऱ्यांच्या हक्काच्या बाजारपेठेतील ग्राहक व व्यापारी यांच्या हकाच्या दुकानासमोर अनधिकृतरित्या आपला व्यवसाय थाटणाऱ्या हातगाडी व पथारीवाले यांच्यातील बाजारपेठेत सदर हातगाडी वाले व पथारीवाले यांनी त्यांचे व्यवसाय थाटू नये व त्यांची योग्य ती व्यवस्था, त्यांचा उदरनिर्वाह सुरू राहावे या दृष्टीने इतर ठिकाणी त्यांना महानगरपालिका ने प्रस्थापित करून बाजारपेठेतून त्यांना स्थलांतरित करावे ही व्यापाऱ्यांची व अहमदनगर व्यापारी महासंघाची प्रमुख मागणी कायम आहे व तत्पूर्वी कोणत्याच कारणानं सदर आंदोलन माघे घेतले जाणार नाही.

तशा आशयाचे पत्र देखील अहमदनगर व्यापारी महासंघास आंदोलन केले गेले त्यावेळी तत्कालीन आयुक्त श्री शंकर गोरे यांनी लेखी स्वरूपात दिलेले आहे. अहमदनगर व्यापारी महासंघाने पुकारलेले सदर आंदोलन हे जातीयवाद न करता आमच्या हक्कासाठी आम्ही लढत असल्याने आमच्या प्रमुख मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कायम स्वरुपी चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी व कुठल्या ही भुलथापांना बळी पडू नये म्हणून मुद्दाम सदर चा जाहीर खुलासा सर्वांच्या महितिस्तव प्रसारित करण्यात येत आहे. अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील सदर हातगाडी वाले व पथारीवाले यांचे अतिक्रमण जो पर्यंत निघत नाही तो पर्यंत अहमदनगर व्यापारी महासंघ शांत बसणार नाही. ह्या खोडसाळ प्रकारामुळे आम्हास अनेक संघटनांनी घोषित केलेला त्यांचा पाठिंबा व सहकार्याच्या पाठबळावर अहमदनगर व्यापारी महासंघ आपला आंदोलन अजून तीव्र करणार आहे. सदर खुलासा अहमदनगर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष ईश्वर बोरा, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष रवी किथानी, महावीर कांकरिया, एम जी रोड व्यापारी असोसिएशन चे संचालक प्रतीक बोगवत यांनी पत्रक काढून जाहीर केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular