Homeराज्यमहाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता पाच सदस्य घटनापीठा कडे आता या दिवशी...

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता पाच सदस्य घटनापीठा कडे आता या दिवशी होणार सूनवणी

advertisement

दिल्ली. दि.२३ ऑगस्ट

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता पाच न्यायमूर्तींच्या घटना पीठाकडे गेले असून ही सूनवणी गुरुवारी म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी गुरुपुष्यामृत योग असून शिवसेना आणि शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले शिंदे गट यांच्यामध्ये चाललेल्या सत्ता संघर्षाची सूनवणी या दिवशी होणार आहे.

पाच सदस्य घटनापिठाकडे हे प्रकरण सोपवल्यानंतर गुरुवारी यावर नेमकी काय सूनवणी होणार की पुन्हा एकदा तारीख तारीख पडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

शिवसेना नेमकी कोणाची याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण हे कोणाकडे जाणार याबाबतही अजूनही टांगती तलवार आहे. त्यामुळे सध्या तरी या प्रकरणाबाबत दोन्ही गटांकडून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

ज्या न्यायमूर्तींसमोर या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे ते न्यायमूर्ती 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असून त्यामुळे आता या प्रकरणात अनेक ट्विस्ट निर्माण झाले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular