श्रीगोंदा दि.२९ जुलै
राजकीय नेते मंत्री निवडणुकीच्या काळात अनेक आश्वासने देतात मात्र ती संपूर्ण आश्वासने पूर्ण होतात का नाही हा मोठा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच अजूनही भयानक परिस्थिती या देशात आहे असे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळते एकीकडे गगनचुंबी इमारती आणि प्राण्यांसाठी ही अंत्यसंस्कारासाठी फाईव्ह स्टार सेवा उपलब्ध होत असते तर एके ठिकाणी माणसाच्या मरणानंतरही त्याला मरण याताना सोसाव्या लागतात असे चित्र भारतात पाहायला मिळतं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका आणि या तालुक्यातील भिंगानगाव हे अनेक कालखंड मूलभूत प्रश्नांपासून उपेक्षित असलेले गाव वीज,पाणी आणि रस्ते यापासून खूप दूर राहिलेल्या या गावाला पूर्वपदावर आणण्यासाठी अनेकांनी संघर्ष केलाय परंतु पावसाळ्यामध्ये पाण्याने वेढून इतर गावं तसेच तालुक्याच्या संपर्कातून तुटणारे हे गावं येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उदासीनतेमुळे विकासापासूनच वंचित राहिलेले आहे.
आदिवासी भिल्ल समाजाची लक्षणीय लोकसंख्या असलेले हे गाव विकासापासून शेकडो मैल दूर आहे ज्या गावात 28 जुलै रोजी माणसाला मारणानंतरच्या मरण येताना काय असतात याचा प्रत्यय या ठिकाणी आला अंकुश गुलाब गायकवाड या आदिवासी भिल्ल समाजाच्या इसमाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आणि कुटुंबावर आभाळच कोसळले,नुसते कुटुंबावरच नाही.. तर, यांच्या अंत्यविधीवरही आभाळ कोसळले. दुर्भाग्याची चरम सीमा काय असावी..? याचे जिवंत चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले आहे.मयत अंकुश गायकवाड यांचा अंत्यविधी करताना भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरी यांच्या मृत्युमुळे डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंइतक्या वेदनादायी ठरल्या.! कारण,मृतदेहाला अग्निसंस्कार करताना आलेल्या पावसामुळे चिता भिजण्याचा धोका निर्माण झाला.येथील ग्रामपंचायत असलेल्या चोराची वाडी ने नमूद ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी शेड उभा केलेले नाही.कोणतीही सुविधा नसल्याने अंत्यविधी ग्रामस्थांना उभ्या पावसात करावा लागला.अक्षरश:चितेवर ताडपत्री धरून,सर्व लोकांनी त्या ठिकाणी हा अंत्यविधी पार पाडला आहे. अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना केवळ शासकिय सुविधांच्या अभावामुळे तालुक्यातील भिंगान या ठिकाणी घडली आहे.
पहा व्हिडीओ
ज्या देशाच्या सर्वोच्च पदावर अदिवासी समाजाच्या राष्ट्रपती पदी दौप्रदी मूर्मु होत विराजमान होत असताना एका दुर्दैवी आदिवासीच्या अंत्यविधीसाठी छत नसणे..! किती बेबस आणि लाचार करणारी घटना..! या तालुक्यातील आदिवासी समाजाला तसेच भिंगान ग्रामस्थांना भोगावी लागलेली आहे.याचे हे जिवंत अहमदनगर जिल्ह्यात चित्रण पहावयास मिळाले आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या उपक्रमातील हर घर तिरंगा लावायचा कुठे..? घर नसताना…! आणि मूलभूत सुविधा नसताना आमची प्रेत कोणत्या स्मशानात अंत्यसंस्कारित करायची…? या घटनेवरून हा प्रश्न पीडितांसह तालुक्याला पडलेला आहे.