अहमदनगर दि.२७ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील वारुळाचा मारुती परिसरात शहरात सापडणाऱ्या बेवारस मृतदेहांवर महानगरपालिकेच्या वतीने अंतिम संस्कार करण्यात येतो. बेवारस मृतदेह असल्यामुळे हे मृतदेह जाळून न टाकता त्याचा दफन विधी करण्यात येतो.मात्र या ठिकाणी एक धक्कादायक बाब समोर आली असून जमिनीच्या अवघ्या एक फूट अंतरावर मृतदेह दफन केले जातात त्यामुळे या ठिकाणी असलेल्या भटके कुत्रे हे मृतदेह पुन्हा उकरून काढून लचके तोडतानाच भयानक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय.
या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी याबाबत आवाज उठवला असून दफन विधी करत असताना किमान तीन-चार फूट खोल अंतरावर करावे की जेणेकरून भटके कुत्रे या मृतदेहांपर्यंत पोहोचणार नाही. काही नागरिकांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता फक्त एक फुटांवर बेवारस मृतदेह दफन करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
पहा व्हिडिओ