अहमदनगर दि.२३ ऑगस्ट:
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले की पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करा वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी
कविता शंकर कराळे सह मुलगा ओमकार व मुलगी कृतिका यांचे विरुध्द पाथर्डी पोलिस स्टेशन येथे खोटे गुन्हे दाखल केले आहे याची शहानिशा करावी व योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना यावेळी देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप, जिल्हा सल्लागार जिवन पारधे, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रविण ओरे, गणेश राऊत,भिंगार शहर उपाध्यक्ष बबलू भिंगारदिवे, बबलू भिंगारदिव,भिंगार शहर संघटक राजु भिंगारदिवे, भिंगार शहर उपाध्यक्ष राहुल पाडळे,गणेश सकट, प्रशांत दुसूंगे, आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की वंचित बहुजन महिला आघाडीच्या सदस्या कविता शंकर कराळे व त्यांच्या मुलांन विरुद्ध खोटे असे गुन्हे दाखल केले आहे. कराळे कुटुंबीय नातेवाईकाचे लग्नाला गेले असता लग्नामध्ये वाद झाल्याने घटनेमध्ये नसतानाही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व घटनेचा व्हिडिओ देखील आहे त्यामध्ये निष्पन्न झाले आहे की कराळे यांचे दोन्ही मुलांचा या मध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तरीही पाथर्डी पोलीस ठाण्याचे वतीने खोटे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच कविता कराळे यांची फिर्याद नोंद झाल्यानंतर आरोपींच्या वतीने सुवर्णा रविंद्र मुळे यांनी खोटी फिर्याद देत कविता कराळे यांचे दोन्ही मुलांचे नाव सदर फिर्यादीत जाणुनबुजून गोवण्यात आले जे की घटनास्थळी उपस्थित होते, परंतू ते घाबरुन बाजुला उभे होते. तसेच मुलगा ओमकार याच्या मोबाईलवरुन लाईव्ह प्रक्षेपण शंकर कराळे पहात होते. त्यांनी सर्व घटना ही रेकॉर्डिंग करुन घेतलेली आहे.
म्हणून पोलिस अधिक्षक साहेब यांना विनंती आहे की, घडलेल्या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन आरोपी रवि मुळे व इतर तसेच खोटी फिर्याद दाखल करणारे सुवर्णा रवि मुळे यांच्यावर कारवाई करुन त्यांनी केलेली फिर्यादीमधील मुलगा ओमकार व मुलगी कृतिका यांचे नावे कमी करावीत कारण त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये तसेच ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत.
तसेच १००, ११२ या नंबरवरुन पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना सदर घटनेची माहिती मिळुन देखील त्यांनी घटनास्थळी कोणताही बंदोबस्त न पाठविता कर्तव्यात कसुर केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर व संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरुन खात्या अंतर्गत चौकशी करुन कार्यवाही करावी. असे निवेदनात म्हटले आहे.