HomeUncategorizedहेच अहमदनगर महानगरपालिकेचे थ्री स्टार मानांकन का? कचरा संकलन ठेकेदार हा काय...

हेच अहमदनगर महानगरपालिकेचे थ्री स्टार मानांकन का? कचरा संकलन ठेकेदार हा काय मनपा च्या अधिकारी वर्गाला जुमानत नाही का? कचऱ्यांच्या ढीगांचे फोटो टाकत निखिल वारे यांचा महानगरपालिका प्रशासनाला सवाल

advertisement

अहमदनगर दि.२९ ऑक्टोबर
सरकारच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, कचरामुक्त शहरासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलित केला होता. शहरातील कचरा कुंड्याही हटविण्यात आल्या होत्या दारोदारी घंटाघाडी फिरली. शहरातील रस्त्यावर पडणारा कचराही हटविण्यात आला. नागरिकांनीही महापालिकेच्या प्रयत्नांना साथ दिली. त्याम्ुळे शहर स्वच्छ झाले आणि थ्री स्टार मिळाला होता.

मात्र हा दिखावा फक्त काही काळापुरताच राहिला असून शहर पुन्हा स्वच्छतेकडे वाटचाल करत आहे. प्रत्येक कॉलनीच्या सुरुवातीलाच कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. सावेडी उपनगर मधील असा एकही परिसर नाही की त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येत नाहीत. महानगरपालिकेने स्वच्छता राखण्यासाठी स्वयंभू संस्थेला ठेका देऊन घंटागाडीमार्फत कचरा उचलण्यासाठी ठेका दिलेला आहे. मात्र या गाड्या खरंच कचरा उचलतात का किंवा या गाड्या कचरा उचलण्याऐवजी कुठे फिरत असतात याचा शोध महानगरपालिका प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्यांचे साम्राज्य साचले असून फक्त काही निमित्त असेल तरच कचरा स्वच्छ करण्यात येत आहे आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येतात.

अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रभागातील विविध ठिकाणी असलेल्या कचऱ्यांचे ढीग असलेले फोटो व्हायरल केले आहेत आणि महानगरपालिका प्रशासनाला काही प्रश्न विचारले आहेत हेच अहमदनगर महानगरपालिकेचे थ्री स्टार मानांकन का? , कचरा संकलन ठेकेदार हा काय मनपा च्या अधिकारी वर्गाला जुमानत नाही का? अधिकारी काय फक्त खुर्च्या उबवायला आलेत का?,सर्व कामे नगरसेवकांनीच करायचे का?, हेच महाराष्ट्रातील 6 नंबर स्वच्छ शहर आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता महानगरपालिका प्रशासन देणार का कारण शहरात अनेक नगरसेवकांना कचऱ्याचा प्रश्न उद्भवत आहे. मात्र महानगरपालिका प्रशासन फक्त टोलवाटोलवी आणि उडवा उडवीचे उत्तर देऊन दिवस पुढे घालवत आहेत. महानगरपालिकेने ठेका दिलेल्या स्वयंभू संस्थेबाबत महानगरपालिका प्रशासन कठोर भूमिका का घेत नाही? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतोय. नगर शहराच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न ठेकेदार संस्था करत असताना प्रशासन गप्प का त्यांच्यावर कारवाई कधी होणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular