Homeराजकारणतरुणांनो भुलभुलैया करणाऱ्या राजकारण्यांच्या मागे जाऊ नका राजकारणाचा उपयोग सामन्य जनतेसाठी करा..राजकीय...

तरुणांनो भुलभुलैया करणाऱ्या राजकारण्यांच्या मागे जाऊ नका राजकारणाचा उपयोग सामन्य जनतेसाठी करा..राजकीय पदाधिकाऱ्यांनंतर विद्यार्थी, युवकांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश ; जिल्हाध्यक्ष काळेंनी विद्यार्थी, युवकांना दिला चतुश्रृती कार्यक्रम

advertisement

अहमदनगर दि.३० जुलै

अहमदनगर शहरात काही दिवसांपूर्वी अत्यंत डबघाईला आलेल्या काँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत. अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये चांगलेच इनकमिंग सुरू झाले आहे जे लोक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत ते पक्षाकडे लक्ष देत नाहीत मात्र नव्याने काँग्रेस पक्षात दाखल झालेले किरण काळे यांनी पक्षाची अधोगती रोखत पक्षात नवचैतन्य आणले आहे.

शहरातील विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांचे काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश सत्र सुरू आहे. राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यानंतर आता शहरातील विद्यार्थी व युवकांनी शहर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल काळोखे यांनी आपल्या विद्यार्थी, युवक सहकाऱ्यांसह काळे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी, युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अतुल काळोखे म्हणाले की, नगर शहरामध्ये दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. रोजगाराच्या संधी तर दुरापस्त झाल्या आहेत. विद्यार्थी, युवकांना शिक्षण, रोजगारासाठी नगर सोडून बाहेर जावे लागते. यासाठी नगर शहरातील विद्यार्थी, युवकांसाठी आपल्याच नगरमध्ये दर्जेदार उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची गरज आहे. या संधी नगर शहरामध्ये आणण्याचे व्हीजन हे उच्चशिक्षित, सुसंस्कृत युवा नेतृत्व असणाऱ्या किरण काळे यांच्यामध्ये आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन मी व माझ्या सहकाऱ्यांनी विद्यार्थी व युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

या वेळी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी विद्यार्थी आणि युवकांसाठी एक चतुश्रृती कार्यक्रम सांगितला असून तरुणांनी राजकारणात कशासाठी यावे आणि राजकारण आल्यानंतर काय करावे यासाठी हा चतुश्रृती कार्यक्रम राबवला तर राजकारणात नक्कीच आपण यशस्वी होऊ असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले पुढील काळात काँग्रेस हा कार्यक्रम राबवणार असल्याचाही किरण काळे यांनी सांगितला आहे

◾ विद्यार्थी व युवकांसाठी करिअर मार्गदर्शन उपक्रमांचे आयोजन करणे,
◾ *विद्यार्थी व युवकांना गुंडगिरी व गुन्हेगारीकडे वळण्यापासून परावर्तित करणे*
◾ *त्यांना व्यसनाधीन होण्यापासून रोखणे, व्यसनाधिनतेकडे वळालेल्या विद्यार्थी व युवकांना व्यसनमुक्त करणे,*
◾ *नीतिमत्ता, मूल्य, वडीलधाऱ्यांचा आदर, सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहण्याची दृष्टी असणारे संस्कारक्षम विद्यार्थी व युवक घडविणे.*

विद्यार्थी अध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, युवक अध्यक्ष प्रवीणभैया गीते पाटील म्हणाले की, किरण काळे यांनी विद्यार्थी व युवकांना दिलेल्या चतुश्रृतीची अंमलबजावणी करणे हे नगर शहरातील भावी युवा पिढी घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आज शहरातील युवकांमध्ये शिक्षण व रोजगारासाठी नगर शहराबाहेर स्थलांतर करावे लागत असल्यामुळे आणि शहरामध्ये या संधींचा अभाव असल्यामुळे नैराश्याची भावना आहे. पालकांमध्ये देखील उदासीनता आहे. त्यामुळे काळे यांनी दिलेल्या या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे काम माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व युवक काँग्रेस शहरामध्ये करणार आहे.

यावेळी युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, मोजेस ससाणे, राहुल खरात, श्रेयस वैराळ, सारिका काळोखे, साहिल वाघमारे, मच्छिंद्र साळुंखे, सुरज गुंजाळ, शंकर जगताप, हर्षल काकडे, शंकर आव्हाड, अक्षय पाचरणे, विशाल घोलप, ओंकार नऱ्हे, अजय घोलप, स्वप्निल पाठक, सागर बिल्ला, काँग्रेस शहर उपाध्यक्ष अशोक शिंदे, निलेशदादा चक्रनारायण, इंजि. सुजित क्षेत्रे आदी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular