अहमदनगर दि.१८ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यात जवळपास नऊ लाख नागरिकांनी कोरोनाचे एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री हसनमुश्रीफ यांनी दिली आहे.तर पाच लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक डोस घेत नासल्याने आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलणार आहे कोरोना लसीचा एकही डोस न घेणाऱ्या नागरिकांना आता पेट्रोल, रेशन तसेच इतर सुविधांपासून मुकावे लागणार आहे त्यामुळे आता पेट्रोल पंप वर गेल्यावर अथवा रेशन दुकानात गेल्यावर अथवा प्रशासनाच्या काही सेवांचा लाभ नागरिक घेत असतील तर त्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यात लागणार आहे याबाबत ालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकार्यांना तशा सूचना दिल्या आहेत नगर जिल्ह्यात उद्यापासून या कारवाईला सुरूवात होणार आहे.
पहा व्हिडीओ👇