Home जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतिक : कॅप्टन शेख ,स्मायलिंग अस्मिता आयोजित...

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतिक : कॅप्टन शेख ,स्मायलिंग अस्मिता आयोजित जनजागृती शिवजयंतीच्या कार्यक्रमात कॅप्टन शेख यांचे मनोगत.

अहमदनगर दि १९ फेब्रुवारी

शिवजयंतीच्या एक दिवस अगोदर स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून जनजागृती शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात येते. या वर्षी भारतीय सैन्य दलातील मराठा लाईट इंफ्रंट्रीचे कॅप्टन बशीर शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की जेव्हा राष्ट्रपती भवनात किंवा संरक्षण मंत्री यांच्याशी देशाच्या सुरक्षा संबंधित चर्चा करतो:त्यावेळी आम्ही नेहमीच अभिमानाने सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलेलो आहोत, कितीही मोठे संकट आले तरी मागे हटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतिक आहे.छत्रपतींनी इथल्या भुमिपुत्रांसाठी परकीय राजवटीशी संघर्ष केला.आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारताच्या अखंडतेसाठी महत्वाचा आणि मार्गदर्शक आहे.

कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी स्मायलिंग अस्मिताचे कौतुक करत ग्रामिण भागातील शेतकरी विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मदतीसाठी पुढे राहूच सोबतच शासकीय सेवेच्या निवृत्तीनंतर आता पूर्ण वेळ छत्रपतींचा इतिहास पुढे येण्यासाठी कार्यरत राहील असे सांगितले.

जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी छ्त्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन करत शेतकरी कुटुंबातील पोरांनी हार न मानता येणाऱ्या परिस्थितीशी संपुर्ण ताकदीने सामना करावा असे मत व्यक्त केले .

नगरसेवक डॉ सागर बोरूडे म्हणाले की आम्ही शेतकरी विद्यार्थी चळवळीला नेहमीच पाठबळ दिले आहे; कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शेतकऱ्यांचे पाठीराखे व्हा असे सांगतो म्हणून आम्ही नेहमीच स्मायलिंग सोबत आहोत.

न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भास्करराव झावरे यांनी छत्रपतींच्या दूरदृष्टी बाबतीत विचार मांडले. शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य सातारकर, मुन्ना चमडेवाले, पारस कोठारी आदिंची मनोगते झाली.

कार्यक्रमाला भारतीय सैन्य दलातील शिवाजी महाडिक,पद्माताई गांगर्डे,सविता मोरे,अनुराधा येवले,कांता बोठे,आबासाहेब सोनावणे, सुभाष कडलग, आप्पा शिंदे, डॉ अविनाश मोरे मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंबातील मुलींचाही सहभाग दिसून आला शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता हे पुस्तक देण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन दोन आठवड्यापासून सुरू होते यासाठी स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल,रिनुल नागवडे,धिरज कुमटकर, सचिन सापते,शुभम मिसाळ,अस्लम शेख,भूषण तोडमल, निखिल शिंदे, विनीत गाडे यांनी परिश्रम घेतले होते.कार्यकमाचे प्रास्ताविक इरम शेख यांनी केले तर सुत्रसंचलन फिरदोस सय्यद व पुजा झिने यांनी केले तर आभार प्रदर्शन साधना जवरे यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version