मुंबई-
राज्याचे परिवहन तथा संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन एसटी कामगार संपाच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करण्यात यावा तसेच अहमदनगर शहरातील तारकपूर, माळीवाडा तसेच पुणे बसस्थानक या तीनही बसस्थानकांना बीओटी तत्वावर आधुनिक पध्दतीने विकसित करण्याबाबत निवेदन देत सविस्तर चर्चा केली. अनिल परब साहेबांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही दिली. या केलेल्या मागण्या मान्य झाला तर नगर शहरातील बस स्थानक वेगळ्या रूपात दिसतील आणि याठिकाणी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येतील तसेच नगर शहराच्या सौंदर्यात भर पडेल त्यामुळे या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी संग्राम जगताप यांनी केली या मागण्यांना अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच याबाबत आदेश काढले जातील अशी ग्वाही दिली