औरंगाबाद – दि.३० जानेवारी
ऐकावं ते नवलच होय अशीच ही बातमी असून औरंगाबाद येथील एका व्यक्तीने शहरात असे बॅनर लावले की सध्या हा बॅनर ची चर्चा अख्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे.या महाशयांना निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे असून जती पतीची काहीही अट नाही अट फक्त एकच आहे म्हणजे दोन अपत्ये असलेली किंवा नसलेलीली कोणतीही महिला चालेल असे या बॅनर वर उल्लेख आहे.
रमेश विनायकराव पाटील या पस्तीस वर्षीय इसमाला लॉकडाऊनमध्ये तिसरे अपत्य झाले. तीन अपत्य झाल्यामुळे त्यांना मनपा निवडणूक लढता येणार नाही. मात्र त्यांना निवडणूक लढवण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी थेट शहरभर बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर लावले आहे. या बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असवी हेसुद्धा लिहले आहे.या बॅनरची चर्चा सध्या चावडी चावडीवर मोठ्या खमंगपणे सुरू आहे.