अहमदनगर दि. ६ एप्रिल
अहमदनगर शहरातील पाणी प्रश्न भीषण स्वरूप घेत असून बुधवारी राष्ट्रवादी कांग्रेस आणि भाजपने महापालिकेत अतिरिक्तआयुक्तांना भेटून पाणी प्रश्नावर धारेवर धरले होते.
सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेवर मटका मोर्चा काढण्यात आला होता आगरकर मळा,आनंदनगर, गजानन कॉलनी,स्मृती कॉलनी, एकता कॉलनी, विशाल कॉलनी, बेलेश्वर कॉलनी, एम एस ई बी कॉलनी,अर्बन बँक कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, गवळीवाडा, संभाजी कॉलनी, सर्व स्टेशन रोड परिसर, मल्हार चौक, परक पार्क, संजीवनी कॉलनी, या सर्व परिसरांमध्ये गेल्या सहा महिन्यापासून पाणी कमी दाबाने येत असल्याने या भागातील नागरिकांनी महापालिकेत येऊन मटका फोड आंदोलन केले.
माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते युवासेना प्रमुख विक्रम राठोड माजी नगरसेवक दत्ता जाधव माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या सह आगरकर मळा भागातील महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या
पाणी प्रश्नांवर महिला अत्यंत संतप्त झाल्या होत्या महिलांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांना महिलांनी चांगलेच धारेवर धरले होते. पाणी द्या पाणी द्या आयुक्त साहेब पाणी द्या घोषणांनी महापालिका दणाणून गेली होती
महापालिकाअतिरिक्त आयुक्त प्रदिप पठारे यांनी माहिलांशी चर्चा केली पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना महिलांनी चांगलेच सुनावले पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सातपुते यांनी पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या अडचणी सांगितल्या मात्र महिलांना त्यांच्या उत्तरातून समाधान झाले नाही.
टँकर ने पाणी देण्यास नागरिकांनी विरोध करून आम्हाला नळा द्वारे पाणी हवे असा पवित्रा घेतला होता काही भागात चोरून पाण्याची लाईन देत असल्याने आगरकर मळा भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचा आरोप दिलीप सातपुते यांनी केला.