अहमदनगर दि ५ मार्च
महराष्ट्रात काही शहारत महादेव मंदिरात नंदी दूध पितो अशी अफवा पसरली असून संध्याकाळच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला आहे. तर अजूनही काही काही ठिकाणी मंदिरासमोर भक्त गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावा मध्ये अक्षरशः पोलिसांनी बंदीबस लावला असून इतक्या मोठ्या प्रमाणावर मंदिरात गर्दी होत आहे
हा कोणताही चमत्कार नाही
अंनिसचे भाविकांना आवाहन .
देशात अन राज्यात आज नंदी, महादेवाची मूर्ती ,कासव हे पाणी पितानाचा चमत्कार सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे .भाविक बिचारे तर्क बाजूला ठेवत मंदिरात रांगलावत पाणी,दूध पाजण्याचा चमत्काराचा अनुभव घेताना आढळून येत आहेत .कोणतीही निर्जीव वस्तू,मूर्ती,दूध पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी,दूध खेचते ते केवळ पृष्टीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळे. त्याला केशाकर्षण नियम असेही म्हणतात,समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणूचा असलेला पृष्टीय थर हा दुसरा त्याच गुणधर्माचा थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो .मूर्ती स्वतः पाणी खेचते असते ती एका थेंबाच्या रूपात असते आणि नवीन पाण्याचा चमचा ज्या वेळेस त्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो त्यावेळेस ते पाणी खेचले जाते. याला विज्ञानाच्या भाषेत सरफेस टेन्शन किंवा पृष्टीय ताण असे म्हटले जाते .या घटना खऱ्या आहेत मात्र त्याचे निदान चुकीचे काढले जात आहे,यामागे कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.