Home विशेष वरून सर्व छान मात्र आतून घाणंच घाण…महापालिका स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे दिव्याखाली अंधार,...

वरून सर्व छान मात्र आतून घाणंच घाण…महापालिका स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे दिव्याखाली अंधार, आयुक्त साहेब एकदा या महापालिकेच्या स्वच्छता गृहात जाऊन दाखवाच

अहमदनगर दि २४ जानेवारी
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ आणि माझी वसुंधरा अभियान २.० नगर शहारा मध्ये राबविण्यात येत आहे.  नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या अभियानात स्वच्छतेच्याबाबत नगरला फाईव्ह स्टार मानांकन देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवून देण्याचा संकल्प महापौर रोहिणी शेंडगे यांनी केला  असल्याचं एका कार्यक्रमात बोलताना महापौरांनी सांगितलं खरं मात्र या संकल्पला थेट महापालिका प्रशासनाकडूनच छेद दिला जाऊ शकतो.

महानगर पालिकेच्या बांधलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहांची आजची परिस्थिती पहिली असता पालिका प्रशासन फक्त कागदावर स्वच्छता अभियान राबवत आहे असं दिसून येतंय.लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृह बांधले गेले आहेत.यासाठी दरवर्षी हजारो रुपयांचा निधी स्वच्छता आणि आतील वस्तू बदलण्यासाठी खर्च केला जातो. सर्वेक्षण करण्यासाठी बाहेरून टीम अली की त्यांना दाखवण्या साठी स्वछता केली जाते रंगरंगोटी केली जाते स्वच्छता गृहात नळ बेसिन आशा सर्व गोष्टी बसवल्या जातात मात्र सर्वेक्षण संपले की या वस्तू पुन्हा गायब होतात.

या स्वच्छतागृहांच्या उपयोग होतच नाही कारण स्वच्छतागृह बाहेरच ईतकी घाण असते की स्वच्छतागृहात माणूस जाऊच शकत नाही अथवा पाय ठेऊ शकत नाही. अशी परिस्थिती सध्या नगर शहरातील सर्वच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या आहे.

महिला भगिनींन साठी नगर शहरातील मध्यवस्तीत कापड बाजार परिसरात एक स्वच्छतागृह बांधावे अशी मागणी अनेक महिला संघटनांनी आजपर्यंतच्या सर्व महापौरांकडे केली होती विशेष म्हणजे या आधी सुद्धा महिला महापौर होऊन  गेल्या आहेत मात्र त्यांनीही कधी या महिलांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही ती मागणी अद्यापही धूळखात पडली आहे.

एकीकडे महापालिका प्रशासन गाजावाजा करून लाखो रुपयांचा खर्च करून स्वच्छता अभियान राबवते मात्र खरी घाण जिथे आहे त्या ठिकाणी जाऊन महापालिका प्रशासनाने स्वच्छता करायला हवी हीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उदाहरणा दाखल प्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील सार्वजनिक शौचालय घेतले असता या शेजारी महानगरपालिकेचे विविध कार्यालय आहेत या ठिकाणीं रोजच महानगरपालिकेचे कर्मचारी ये-जा करत असतात काही महिला कर्मचारी या कार्यालयात कामाला आहेत मात्र या सर्वांना या स्वच्छतागृहाचा उपयोग करता येत नाही कारण या ठिकाणी घाणच एवढी आहे की माणूस ते पर्यंत पोहोचू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version