अहमदनगर दि.२४ ऑगस्ट
अहमदनगर जिल्हा आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात चांगलाच गाजला भाजपचे आमदार निलेश राणे यांनी श्रीरामपूर येथील श्रीरामपूर येथे राहणाऱ्या इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्या बाबत प्रश्न उपस्थित करत त्याला गुन्हेगारी कृत्यात पाठीशी घालत असलेल्या निलंबित पोलीस निरीक्षक संजय सानप यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली.
इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर विरुद्ध एक कुटुंब वेळोवेळी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात चकरा मारत होते मात्र त्यांची दखल न घेतल्याने मुलाखतरणे त्या कुटुंबातील मुलीला शेवगाव येथे कुंटणखान्यात विक्री केल्याचे निष्पन्न डी वाय एस पी संदीप मिटके यांनी केलेल्या तपासनंतर उघड झालं होतं त्या मुलीची सुटका केल्यानंतर त्या पीडित मुलीच्या फिरादीनुसार मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांवरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 366 अ 368,370(4),370 (अ),(1),372,373,376(n) सह बाल लैंगिक आत्याचर प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5 (g),6,17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र या प्रकरणाची आधीच दखल घेतली असती तर त्या मुलीला कुंटनखाण्यात विक्रीपासून पोलिसांना रोखता आले असते. मात्र पोलीस निरीक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला. त्यांचे व आरोपीचे आर्थिक संबंध असल्याचे माहिती मिळत असून त्याची चौकशी करावी अशी मागणी ही त्यांनी सभागृहात केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरात असे सांगितले की याबाबतची सर्व चौकशी पूर्ण होईल आणि त्या चौकशीमध्ये पोलीस निरीक्षक सानप दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.
त्याचप्रमाणे संगमनेर शहरात काही दिवसांपासून गोवंशीय जनावरांची कत्तलीचा प्रश्न चांगलाच गाजत असून पोलिसांनी अनेक वेळा या ठिकाणी छापे टाकूनही या ठिकाणचे धंदे बंद होत नसल्याचं समोर येत आहे. जनावरांच्या कत्तलीवरून संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हिंदुत्ववादी संघटनांच्या रडारवर होते. त्यांची तात्काळ बदली करावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह संगमनेरकरांनी 36 तास प्रांत कार्यलयापुढे
ठिय्या आंदोलन केले होते. मात्र त्यावेळी राजकीय दवामुळे त्यांची बदली झाली नाही. मात्र आता राज्यात सत्ता बदल झाला आणि संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची तडका फडकी उचल बांगडी होऊन नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी खोटे गुन्हे दाखल करून चुकीची कारवाई केल्याच्या प्रकरणी त्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे.
नेवासा तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आणि एका मोठ्या दैनिकाच्या प्रतिनधी विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकारा मुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके हे करत आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गतही सध्या अलबेला नसल्याचं समोर येत असून काही कर्मचारी आपसातल्या वादामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल करत असल्याचे माहिती समोर येत आहे. तर एकमेकांविरोधात थेट लाच लूचपतचा सापळा लावण्याचे मनसुबे सध्या आखले जात आहेत या प्रकरणामध्ये काही खाजगी इसमाही गुंतलेले आहेत.
त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या डोक्याला चांगलाच मनस्ताप झाला आहे. मात्र ही गोष्ट वेळेवर रोखली नाही तर अंतर्गत वादामुळे येथे भविष्यात मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या सर्व प्रकरणांकडे लक्ष घालून बिनकामाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जरब बसवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.