Home Uncategorized नगर शहरात सुरू असलेल्या बेकायेशीर ताबा मारणाऱ्यांचा खरा म्होरक्या कधी समोर येणार...

नगर शहरात सुरू असलेल्या बेकायेशीर ताबा मारणाऱ्यांचा खरा म्होरक्या कधी समोर येणार ? पोलिसांनी त्या धक्कादाय गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

अहमदनगर दि.१ जुलै

अहमदनगर शहरात ताबा मारण्याचे प्रकार सुरू असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी शहरातील आमदारांना घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात व्यापारीच व्यापाराच्या मुळावर उठला असल्याचे चित्र समोर आले आहे.

ताबा मारणाऱ्यांची एक टोळी तयार झाली असून ही टोळी मोक्याच्या जागा हेरून काही विशिष्ट समाजाच्या लोकांना त्या मोक्याच्या मोकळ्या जागेत पत्र्याची शेड बांधून देऊन त्या ठिकाणी ती जागा अडवून ठेवली जाते आणि मग जागा मालकाकडे अत्यंत कमी मोबदल्यात ही जागा विकत मागितली जाते कारण त्या जागेवर आधीच लेटीकेशन (ताबा )असल्याने जागा मालक वैतागलेला असतो आणि अखेर तो ही जागा अत्यंत कमी मोबदल्यात समोरच्याला विकतो असा हा डाव काही व्यापारीच करत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

व्यापाऱ्यांनी आणि नगर शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास केल्यास या ताबा मारणाऱ्याचे मूळ कुठे आहे आणि याचा खरा सूत्रधार कोण आहे हे समोर येऊ शकते त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून या प्रकरणातील मूळ सूत्रधार नगरकरांच्या समोर आणावा अशी मागणी सध्या नगरकरांकडून होत आहे.

त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून ताबा मारणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून ताबा मानणाऱ्यांचा म्होरक्या कोण हे समोर आणावा की जेणेकरून नगरकांनाही समजेल खरे ताबे मारू कोण आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version