अहमदनगर दि. जून
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यअभिषेक दिनानिमित्त अहमदनगर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपूलाच्या खालील खांबावर शिवचरित्र रंगवण्याचा शुभारंभ अहमदनगर दक्षिणचे खा.डॉ सुजय विखे पाटील ,आमदार संग्राम जगताप ,माजी महापौर बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, धनंजय जाधव,भाजप शहर अध्यक्ष महेंद्र गंधे,विलास ताठे,नगरसेवक अजय चितळे,नगरसेवक सतीश शिंदे,अविनाश घुले,संजय चोपडा,राष्ट्रिय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, यांच्या उपस्थित करण्यात आला.
अहमदनगर शहरातून जाणाऱ्या नगर पुणे नगर औरंगबाद सोलापूर बीड महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून शिल्पा गार्डन पासून सुरू होणारा हा उड्डाणपूल अशोका हॉटेल पर्यंत असून या उड्डाण पुलाला आधार देणाऱ्या खांबांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र चित्रित करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ते राज्याभिषेक सोहळा असे शिवचरित्र या उड्डाणपुलाच्या खालील खांबांवर पेंटिंग वारे साकारण्यात येणार आहे.